धुळे – मुंबई आग्रा महामार्ग वरखेडी फाट्याजवळ विचित्र अपघातात महिंद्रा कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रात्री उशिरा घडली आहे. अशी माहिती आझाद नगर पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक ३ येथे वरखेडे रोड येथे ट्रक नादुरुस्त झाला होता तो दुरुस्त करण्यासाठी महिंद्रा कंपनीचे २ मेकॅनिक गेले होते, सदर ट्रक दुरुस्तीचे काम महामार्ग येथे मेकॅनिकल सह अन्य तीन जण करत असताना याच दरम्यान मालेगाव कडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली ती धडक इतकी भीषण होती की, त्या ट्रकने काही अंतरावर उभे असलेल्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली यात मेकॅनिकल आणि त्याचा सहकारी रस्त्यावर फेकले गेले. ते दोघे रक्तबंबाळ झाले होते. त्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या विचित्र अश्या अपघाताची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत दोघी आणि गंभीर अश्या चौघांना तातडीने उपचारार्थ रुग्णवाहिकेतून हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी विजय पाटील आणि रमाकांत पाटील दोघे राहणार अवधान यांना मृत घोषित केले, आणि दोघे गंभीर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
अपघात झालेल्या महामार्गावर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमंपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव ज्ञानसिंग भावर हा मध्यप्रदेश मधील रहिवाशी आहे तर एकाची ओळख अजून पटू शकलेली नाही, अशी माहिती आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली आहे. अपघाताच्या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत आझाद नगर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.