चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्याा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
१४ डिसेंबर रोजी मुल तालुक्याआतील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्या त बाबुराव कांबळे व १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्वतरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्याा हल्ल्यात मृत्युं झाला. त्याबआधी ७ डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्याख हल्ल्यात एकाचा मृत्यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्याची आवशक्यता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटटले आहे. याबाबत त्यांनीआवशक्यता वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.